गणपती उत्सवा निमित्त स्वच्छतेचा संदेश

या वर्षी गणपती उत्सवात स्वच्छता विषय घेतला जातो आहे. संतनगर मित्र मंडळाने ‘वायु’ टीम ला हा विषय लोकांपर्यंत पोचवण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल श्री विठ्ठल वाळूंज व संतनगर मित्र मंडळाचे आभार! अंदाजे 500 नागरिकांपर्यंत विषय पोचवता आला.